घरासहीत जनावरांचे गोठे, विद्युत तार आणि झाडेही पडली
भास्कर राऊत मारेगाव
वादळ वाऱ्याने रौद्ररूप घेत घरावरील छप्पर, जनावरांचे गोठे, विजेचे खांब तसेच विद्युत तार आणि झाडांचेही मोठे नुकसान झाले. ही घटना दि. 9 जूनला मारेगाव तालुक्यातील चनोडा येथे घडली. यात शेतकरी तसेच नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून बातमी लिहीपर्यंत कोणीही येथे भेट दिलेली नव्हती.

दिनांक 9 जूनला चार ते पाच वाजेच्या दरम्यान भयानक वादळाला सुरुवात झाली. या वादळाने एवढे रौद्ररूप धारण केले की यात चनोडावासियांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये चनोडा येथील अनेकांच्या घरांची पडझड झाली. जनावरांचे गोठेही उडाले. तर गावामध्ये असलेली अनेक वर्षापासूनची मोठी मोठी झाडे सुद्धा झाडे उन्मळून पडली. तसेच चनोडावासीयांना प्रकाश देणारा सौर ऊर्जेचा खांब सुद्धा उन्मळून पडला. गावातील विजेच्या खांबाचेही मोठे नुकसान झाले असून विजेचे तार सुद्धा तुटलेले आहेत.

चनोडा वासियांनी प्रथमच एवढ्या भयानक वादळ वाऱ्याचे रौद्ररूप बघितले. यात चनडा येथील भोलानाथ सिडाम, देवानंद काकडे, प्रेमानंद काकडे, वामन काकडे,बाबाराव महाकुलकर, तुळशीराम सातपुते, शंकर सातपुते, किशोर तुरंगे, शेषराव सातपुते, नीलकंठ आत्राम,अशोक सातपुते,शाम वाटेकर, हर्षद काकडे,अनिल बुचुंडे यांच्या घरावरील छप्पर उडाले. तर उमाकांत बदकी, रणजित बदकी,संतोष दातारकर यांच्यासह अनेकांचे जनावरांचे गोठेही उडाले. यात चनोडावासियांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून येथील नागरिकांना मदतीची अपेक्षा आहे.

