भास्कर राऊत मारेगाव
जंगलामध्ये चरायला गेलेल्या गाईचा वाघाने फडशा पाडल्याची घटना दिनांक 12 नोव्हेंबरला घडली. वाघाने गाईवर हल्ला करून तिला मारल्यामुळे परिसरात वाघाची दहशत पसरलेली आहे. याकडे वनविभागाने लक्ष द्यावे अशी मागणी आताच जोर धरायला लागलेली आहे.
अर्जुनी येथील मंगेश मनोहर तोडासे यांची गाय दि. 12 नोव्हेंबरला नेहमीप्रमाणे इतर जनावरांसोबत जंगलामध्ये चरायला गेलेली होती. इतर सर्वांच्या गाई परत आल्या. परंतु मंगेश तोडासे यांची गाय परत आली नाही. त्यामुळे मंगेश आणि इतरांनी सकाळी जंगलाकडे जाऊन बघितले असता त्यांची गाय मरून पडलेल्या अवस्थेत दिसली. गाईला मागून फोडलेलं होतं. तसेच गायीच्या मानेवर सुद्धा खाल्ल्याच्या जखमा होत्या आणि बाजूला वाघाच्या पंजाचे ठसे आढळल्याचे नागरिकांनी सांगितले.
मंगेश तोडासे यांची जर्सी गाय ही दुधारू होती. आईला वाघाने मारल्यामुळे मंगेश तोडासे यांचे 35 ते 40 हजाराचे नुकसान झालेले आहे. या घटनेची माहिती मंगेश यांनी वनविभागाला दिल वृत्तलीहीपर्यंत वन विभागाने घटनास्थळाचा पंचनामा केलेला होता.
सध्या कापूस वेचणीचा हंगाम आहे शेतकऱ्यांचे सोयाबीन निघालेले असून शेतकरी आता कापूस वेचणी तसेच तुरीच्या मशागतिकडे वळलेला आहे. आणि अशातच वाघाने गाईवर हल्ला केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
