भास्कर राऊत मारेगाव
वेगाव येथे शेकडो वर्षांपासून काकड आरतीची परंपरा अजूनही जोपासत असून पहाटेच्या वेळी या काकड आरतीने अख्खा परिसर मोहून जातो. त्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झालेले आहे.
कोजागिरी पौर्णिमेपासून काकड आरतीला सुरुवात होते. काकड आरती एक महिना सुरु असते.आणि कार्तिक पौर्णिमेला काकड आरतीचे विसर्जन केले जाते. एक महिना गावातील आबालवृद्ध पहाटेच्या वेळी उठून मंदिरात गोळा होतात. मंदिरातून “” उठा उठा हो सकळीक, वाचे स्मरावा हो गजमुख “” अशा भूपाळी म्हणत गावामधून फिरून पुन्हा मंदिरात काकड आरती येते.
काकड आरतीच्या निमित्ताने गावामध्ये भक्तीमय वातावरणाची निर्मिती झालेली आहे. छोटे मुले सुद्धा पहाटेच्या वेळी अंघोळ करून मंदिरात येऊन मोठ्या भक्तीभावाने भूपाळी म्हणतात. त्यामुळे गावामध्ये एक महिना मोठा उत्साह संचारलेला असतो. शेवटी कार्तिक पौर्णिमेला काकडा विसर्जन करून काकड आरतीची समाप्ती होते.
